Scroll down to see the list of websites which are using ra-507ab7ad2733670b AddThis account.
Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजिhttp://pageoverview.com/website-report/drbawasakartechnology.com
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरच्या वापरामुळे न उगवणारे १ ते २ वर्षाचे जुने कांद्याचे बी १०० % उगवत असल्याचे देशभर शेतकर्यांनी अनुभवले आहे. जर्मिनेटर हे सर्वे प्रकारच्या बियाच्या उगवणीसाठी, रोप व कलम लागवडीसाठी खात्रीशीर असून याच्या वापरने मर, मुळकूज थांबते. द्विदलशेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर जैविक नत्र स्थिरीकरणार्या गाठीमध्ये अपरिमीत वाढ होते. त्यामुळे नत्रयुक्त खतामध्ये बचत होते. पांढर्या मुळीचा जारवा व कार्यक्षमता वाढते. खोडवा पिकाचा फुटवा जोमाने होतो. बहार धरण्यासाठी व कॉलररॉट (करकोचा) वर प्रतिबंधक व प्रभावी ठरले आहे. थ्राईवरच्या वापरामुळे करपा, ताक्या, बोकड्या, केवडा अशा अनेक रोगांवर प्रतिबंध होतो. फुलगळ, फळगळ थांबते. क्रॉंपशाईनरमुळे खराब हवामानातही (धुई, धुळे, पाऊस, कडक ऊन) यापासून पिकाचे संरक्षण होते. फुला-फळांना आकर्षक चमक येते. मालाचा टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे दूरच्या मार्केटमध्ये नेताना ट्रान्सपोर्टमध्ये माल खराब होत नाही. राईपनरमुळे फुले, फळे लवकर पोसतात. मोसम नसतानाही फळांचे उत्पादन घेता येते. फुला-फळांना नैसर्गिक गडद रंग येऊन फळांना गोडी वाढते. प्रोटेक्टंट-पी ह्या आयुर्वेदिक वनस्पतीजन्य पावडरच्या वापरणे मावा, तुडतुडे जाऊन फुलपाखरे, मधमाशा आकर्षित होतात. त्यामुळे परागीभवन चांगले होऊन उत्पादनात हमखास वाढ होते. विशेष म्हणजे प्रोटेक्टंटच्या वापरामुळे शेती मालातील विषारी अंश (Residue) निघून जातात. प्रिझमच्या वापरामुळे प्रतिकूल परिस्थितीतही दरवर्षी एकसारखा बहार फुटतो. शेंडा जोमाने चालतो. खोडवा उत्तम फुटतो. न्युट्राटोनच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण होते. सर्व प्रकारची फळे, फुले पोसली जातात. मालाचे वजन वाढते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे हार्मोनी हे डावणी मिल्ड्यू(केवडा), पावडरी मिल्ड्यू (भूरी) अशा अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या निरनिरळ्या वाढीच्या अवस्थेत प्रभावी व प्रतिबंधात्मक सेंद्रिय बुरशीनाशक आहे. याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. कॉटन-थ्राईवर हे तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच विविध राज्यातील कापूस पिकविणार्या भागातील कापूस उत्पादकतेस वरदान ठरले आहे. प्रतिकूल परिस्थितीत कमी अथवा अधिक पावसातही कापसाचा फुटवा फुलपात्या वाढून फुलपात्यांची गळ न होता त्याचे बोंडात रूपांतर होते. लाग भरपूर लागतो. त्यामुळे उत्पादनात अपरिमीत वाढ होते. पांढराशुभ्र लांब धाग्याचा 'ए' ग्रेड कापूस मिळत असल्याने सर्वोत्तम भाव मिळतो. फरदसाठी फायदेशीर ठरते. कल्पतरू या सेंद्रिय खताच्या वापरणे जमीन भुसभुशीत होऊन हवा, पाणी खेळते राहते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीच्या जैविक, भौतिक गुणधर्मात वाढ होते. पांढर्या मुळीत वाढ होते.
- AddThis User: ra-507ab7ad2733670b